Saturday, March 5, 2011

Interview of Dr. Prakash & Dr. Mrs. Mandatai Amte @ Rambhau Mhalgi Vyakhanmala Thane

Interview of Dr. Prakash & Dr. Mrs. Mandatai Amte @ Rambhau Mhalgi Vyakhanmala Thane

Following news was published in LOKSATTA – THane Vrutant dt. 14th Jan. 2011 , about the interview taken by Mrs. Dhanashree Lelel.

‘आदिवासींमध्ये वैद्यकीय उपचारांची जाणीव वाढली’
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला
ठाणे/प्रतिनिधी
बाबा आमटे यांच्या पावलावर पाऊल टाकत हेमलकसासारख्या आदिवासी भागात डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे दांपत्याने काही मूठभर सहकाऱ्यांना सोबत घेऊन सुरू केलेला प्रकल्प, लोकबिरादरीचे काम, हेमलकसा येथील प्रकल्प उभारताना आलेल्या अडचणी, तेथील आदिवासींशी संपर्क साधताना आलेले अनुभव या साऱ्यांच्या आठवणीत आमटे दांपत्याबरोबर ठाण्यातील श्रोतेही हरवून गेले होते. निमित्त होते ठाण्यात सुरू असलेल्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याखानमालेचे. या व्याखानमालेत आमटे दांपत्याची मुलाखत धनश्री लेले यांनी घेतली. आमटे दांपत्याचा संघर्ष ऐकायला सरस्वती सेकंडरी शाळेच्या पटांगणावर श्रोत्यानी भरपूर गर्दी केली होती.
आमचे बाबा निर्भय होते, आम्हालाही त्यांनी तसेच घडवले. त्यांची व आमची काम करण्याची पद्धती वेगळी आहे. आनंदवनाच्या कारभाराची घडी बसू लागल्यावर आम्हाला हेमलकसा येथे नवीन प्रकल्पासाठी त्यांनी मोक ळे केले. त्यातून आम्ही हेमलकसाचा प्रकल्प चालवून दाखवला. आता पुढील १० वर्षांनी हेमलकसा कसे असेल, याची माहिती आमची मुले, सुना देऊ शकतील, असे सांगून डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या शब्दातून हेमलकसाचे वातावरण सर्वांसमोर उभे केले.






एकेकाळी सुई, डॉक्टरला घाबरणाऱ्या आदिवासींमध्ये आता वैद्यकीय उपचारांबद्दल जाणीव वाढलेली आहे. वर्षांला ४० हजार रुग्ण ओपीडीत तपासण्यासाठी येतात. आता नागपूरहून अनेक डॉक्टर देखील मेडिकल कॅम्पसाठी विनामोबदला काम करण्यासाठी येतात. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात दोन दिवसांच्या कॅम्पमध्ये विविध आजारांवरील २४० ऑपरेशन्स हेमलकसाला केली गेली, अशी माहिती डॉ. प्रकाश आमटे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. १९७६ साली आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेचा विस्तार वाढला असून ६५० मुले आज शिक्षण घेत आहेत. सुरुवातीला त्यांच्या भाषेतील वर्णमाला आम्ही केली. नंतर मराठी आणि नंतर इंग्रजीची ओळख मुलांना करून देण्यात आली. आज याच शाळेची काही मुले डॉक्टर झाली, शिक्षक झाली, वकील झाले, इंजिनीअर झालेत, मात्र हेमलकसाला कोणी विसरले नाही.
हेमलकसाला वन्य प्राण्यांचे अनाथालय सुरू झाले, त्यावर बोलताना डॉ. मंदा आमटे यांनी मला प्राण्यांची फार काही आवड नव्हती. एक एक करीत चक्क वाघ वगैरे यांनी पाळायला घेतल्यावर त्याला मांसाहार देताना मला कसेसे व्हायचे. मी पूर्ण शाकाहारी आहे. आमच्या फ्रिजमध्ये वाघासाठी उरलेले मटण, आमची औषधे, आमच्या भाज्या सारे काही एक त्रच असायचे. आता त्याचे काही वाटत नाही असे मंदाताईनी सांगितले. पुढील जन्मी देखील प्रकाश आमटेंना डॉक्टरचे आयुष्य देऊन गरजू रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य मिळू दे, अशी आपली भावना असल्याचे त्यांनी सांगितले. हेमलकसाला असताना घोणस चावून झालेली विषबाधा, भोवऱ्यातून माणूस फेकला जातो हे पाहण्यासाठी स्वत: भोवऱ्यात उडी मारून पाहिलेला अनुभव.बिबळ्या व मुलीचे नाते..अस्वलाने जखमी केलेल्या माणसावर केलेले उपचार असे अनेक प्रसंग आमटे यांनी सांगितले.
आता आमटे कुटुंबाची तिसरी पिढी, नवीन कार्यकर्ते या कामासाठी तयार झाले आहेत. त्यांच्यावर जबाबदारी सोपवून महिन्यातून दोनदा तरी व्याखाने, कार्यक्रमांसाठी प्रेरणा वाटत आम्ही दोघं फिरत असतो, असे आमटे दांपत्याने शेवटी सांगितले.

Sunday, January 10, 2010

News article in Maharashtra Times 11.01. 2010 about interview of Dr. Prakash & Dr. Mrs. mandatai Amte in Borivali.

समाजातल्या चांगुलपणावर विश्वास
11 Jan 2010, 0115 hrs IST


- म. टा. प्रतिनिधी


'समाजातल्या चांगुलपणावर आमचा विश्वास आहे आणि या विश्वासाच्या आधारावरच हेमलकसाचं काम समाजात उभं राहील'... ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांचे हे उद्गार ऐकून प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. बोरिवलीत सुरू असलेल्या 'शब्द गप्पां'मध्ये मंगळवारी डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. आमटे दाम्पत्याचा जीवनप्रवास ऐकायला यावेळी बोरिवलीकरांची प्रचंड गदीर् उसळली होती.

आमटे दाम्पत्याच्या गप्पांमध्ये आनंदवन ते भामरागड व्हाया हेमलकसा हा प्रवास मांडला. बाबा आमटे यांनी दिलेली प्रेरणा, पुढच्या पिढीवर त्यांनी केलेले संस्कार, प्रकाश आणि विकास आमटे यांचे बालपण याविषयी प्रकाश यांनी मोकळेपणाने सांगितले. सुधीर गाडगीळ यांनी या दाम्पत्याला बोलते केेले. भामरागड लोकबिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेमागचा रोचक इतिहास सांगताना आमटे म्हणाले, 'बाबांनी आम्हाला तेथे पिकनिकला म्हणून नेलं आणि दोन दिवस आम्ही तेथील सगळी आदिवासी गावं फिरलो. तेथील जीवन पाहून मी अस्वस्थ झालो. या लोकांसाठी काम करण्याचा मनसुबा बाबांनी व्यक्त करताच मी त्यांच्यासोबत येण्याचं कबूल केलं.' डॉ. मंदा आमटे यांनी प्रकाश यांना दिलेली साथ आणि मंदाताईंना आदिवासी भागात काम करताना आलेलेे अनुभव ऐकताना प्रेक्षक हेलावून गेेले. आमच्या कामाला लोकमान्यता मिळत असून त्यातून आमचा हुरूप वाढत असल्याची भावना आमटे दाम्पत्याने व्यक्त केली.

Sunday, December 20, 2009

News about problem of DROUGHT in ANANDWAN

Following news was appeared in Maharashtra Times dt. 21st Dec. 2009.

We all should try our level best to help ANANDWAN.

नागपूर + विदर्भ

आनंदवनावर दुष्काळाचे संकट
21 Dec 2009, 0049 hrs IST


- रवींद जुनारकर/पंकज मोहरीर , चंदपूर


अपुऱ्या पावसामुळे आनंदवनावर दुष्काळाचे संकट ओढवले असून, प्रचंड आथिर्क अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोरड्या दुष्काळाला सामोऱ्या जाणाऱ्या राज्यातील इतर शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी दीडशे कुष्ठरोगी, अंध व अपंगांना सोबत घेऊन डॉ. विकास आमटे यांनी 'भारत जोडो स्वरानंदनवन अभियान' सुरू केले आहे. या अंतर्गत डॉ. आमटे महाराष्ट्रभर फिरून लोकशिक्षणाचे प्रयोग सादर करणार आहेत.

आनंदवनाच्या स्थापनेला यंदा साठ वषेर् पूर्ण होत असून, या काळात आनंदवनाला पहिल्यांदाच कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. येथे शेतीतून कोट्यवधीचे उत्पन्न घेतले जाते.

आनंदवनात १३० एकरवर सुमारे ८०० क्विंटल सोयाबीन पीक घेतले जाते. मात्र, यंदा पिकावर उंट अर्काचा प्रादुर्भाव झाल्याने केवळ ६० क्विंटल उत्पन्न झाले. तसेच, सोमनाथ प्रकल्पात दरवषीर् अडीच हजार क्विंटल इतके तांदळाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा तांदळाचे उत्पादनच होऊ शकलेले नसल्याची माहिती कौस्तुभ आमटे यांनी दिली.

येथील बोअरवेल आटल्याने रबी हंगामात ३०० एकरऐवजी १० एकरवरच यंदा उत्पादन घेतले जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने आनंदवनाला यातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे आमटे यांनी सांगितले. तसेच, येथे खासगीरित्या शेती होत असल्याने सरकारी पॅकेजचाही फायदा मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही परिस्थिती राज्यभर असून, दोन वर्षांपासून शेतीचे वास्तव भयंकर आहे. शेतकऱ्यांची वाईट अवस्था लक्षात घेता आनंदवनचे संचालक डॉ. विकास आमटे यांनी हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वरानंदनाचे वीस कार्यक्रम होणार असून, १५ जानेवारीला मराठवाड्यात समारोप होणार असल्याची माहितीही कौस्तुभ आमटे यांनी दिली.

Thursday, November 5, 2009

Photos of Meeting of ASM,Thane on 25th Oct. 2009

These are photos of monthly meeting of ASM,Thane on 25th Oct. 2009.

Speciality of the meeting was this was conducted in the absence of our BHAU NANIVADEKAR.

BHAU has expressed graet satisfaction on the successful managing monthly meeting in his absence.



Stall of ASM, Thane at Vashi

Karyakrtas of ASM, Thane who made this event a grand success with Dr. Prakash Amte & Dr. Mrs. Mandatai Amte.

Photos of ASM, Thane stall at VASHI

Our Bhau Nanivadekar in detailed discussions with Dr. Prakash Amte & Mandatai about developements at ASM, Thane.


A visitor in the stall with Dr. Prakash Amte for his AUTOGRAPH